Sunday, July 31, 2011

शेकाप , आमदार आणि विधिमंडळ

             शेतकरी कामगार पक्ष संपला, पक्षाचे बालेकिल्ले ढासळले, जिल्हापातळीवरील पक्ष अशा अनेक प्रकारच्या टीका पक्षावर करण्यात आल्या, पण तरीही पक्षांनी आपली मुल तत्त्वे न सोडता आपले काम चालूच ठवले. एक काळ होता जेन्वा विधानसभेत पक्षाचे ४० च्या आसपास आमदार होते आता ते ४ आहेत मधल्या काळात ती संख्या २ वर गेली होती. पण तरीही पुन्हा एकदा जोरदार झुंज देत पक्षाने आपल्या आमदारांची संख्या वाढवायला सुरुवात केली आणि काहीअंशी त्यात यश सुद्धा आले.
             आज पक्षाचे विधान सभेत फक्त ४ आमदार आहेत पण ४० आमदार जेवढं काम करतील तेवढं काम हे ४ आमदार करतात. हे सगळा करताना आपल्या पक्षाच्या चौकटीत राहून हे आमदार गरीब, कष्टकरी, कामगार तसेच सामान्य माणसांचे प्रश्न विधानसभेत मांडतात, आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न अभ्यासपूर्ण तसेच आक्रमकपणे विधानसभेत मांडून जनहिताची कामे हे आमदार करतात.
विधानसभेत ज्येष्ठ आमदार भाई गणपतराव देशमुख, भाई विवेक पाटील, भाई धैर्यशील पाटील तसेच मीनाक्षीताई पाटील सभागृह गाजवतात तर वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेत आपले सरचिटणीस हे एकमेव आमदार आहेत पण तरीही जयंत पाटील हे नाव आणि त्यांचे काम संपूर्ण सभागृहाला माहित आहे.
               आज विधान भवनामध्य शेकापचे विधान सभेतील ४ आणि परिषदेतील १ असे एकूण ५ आमदार आहेत. पुढे हि संख्या वाढत जाओ आणि शेकापक्ष दीर्घायुषी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .