रामदेव बाबा काय आहेत कसे आहेत किंवा त्यांचा खरा हेतू काय होता आंदोलन करण्याचा , ह्याला कितीही कारणे किंवा उत्तरे असली तरी अशाप्रकारे मध्यरात्र उलटून गेल्यावर आंदोलन उध्वस्त करणे हि सरकारसाठी शरमेची बाब आहे. रामदेव बाबांच्या नीती आणि चारित्र्याबद्दल कितीही शंका कुशंका उपस्थित केल्या असल्यातरी ह्या आंदोलनामध्ये अनेक निरपराध स्त्रिया, मुले, पुरुष सहभागी झाले होते आणि तरीही सरकारने रात्री १-३० च्या सुमारास हे आंदोलन उध्वस्त केले , ह्यावेळी पोलिसांनी व्यासपीठ सुद्धा जाळून टाकण्याचा अशोभनीय प्रकार केला आहे. ह्या अशा प्रकारच्या लोकशाहीला शोभा न देणाऱ्या कृत्त्याचा आम्ही निषेध करतो..........
No comments:
Post a Comment