Friday, June 10, 2011

राष्ट्रवादीचे जातीय राजकारण

              सामाजिक परिवर्तनाची सनद मांडण्याची राष्ट्रवादीसारख्या पक्षाला गरजच काय, सलग ११ वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाला अशा प्रकारच्या सनदी मांडून फक्त दलित वोटबँकेला आकर्षित करायचं एवढंच. स्वतःला सेक्युलर म्हणवत आतापर्यंत सगळ्यात जास्त जातीचं राजकारण राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हेच पक्ष करत आलेत. रामदास आठवले so called शिवशक्तीमध्ये सामील झाल्याने आपली दलित वोटबँक दूर जाते कि काय अशी भीती वाटू लागल्याने राष्ट्रवादीने आता अशी पावले उचलली आहेत. आम्ही जनतेला आवाहन करतो कि आता तुम्हीच जातीयवादी पक्ष कोण ते ओळखा आणि योग्य तो निर्णय घ्या. 
             शेकापच्या बाबतीत असे आरोप करणे आतापर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाही आणि कोणी करूही शकत नाही कारण शेकाप हा कोणतेही जाती-धर्मभेद न मानता गरीब आणि शेतकरी तसेच सामान्य माणसासाठी झटणारा पक्ष आहे. 

No comments:

Post a Comment